0
चौथी कसोटी आजपासून; मालिका जिंकण्यासाठी भारताचा पक्का गृहपाठ मुंबई /चौथी कसोटी आजपासून; मालिका जिंकण्यासाठी भारताचा पक्का गृहपाठ स्थळ : वानखेडे स्टेडियम.. मार्च २००६ : इंग्लंडचा २१२ धावांनी शानदार विजय.. नोव्हेंबर २०१२ : इंग्लंडचा दहा विकेट्स राखून दणदणीत विजय.. डिसेंबर २०१६ : कोण जिंकणार? वानखेडे स्टेडियमचा गेल्या दहा वर्षांचा इतिहास इंग्लिश संघाला साथ देतो. चार वर्षांपूर्वी केव्हिन पीटरसनने उभारलेली शतकी खेळी ही भारतीय भूमीवर परदेशी फलंदाजाने साकारलेली एक संस्मरणीय खेळी ठरली आहे. याशिवाय २०११ (इंग्लंड), २०१२ (भारत) आणि २०१४ (इंग्लंड) या मागील तिन्ही मालिकांवर इंग्लंडचेच प्रभुत्व होते. त्यामुळेच इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक वानखेडेच्या बालेकिल्ल्यावर आशावादी आहे. पहिली कसोटी (राजकोट) : अनिर्णित.. दुसरी कसोटी (विशाखापट्टणम्) : भारताचा २४६ धावांनी विजय.. तिसरी कसोटी (मोहाली) : भारताचा ८ विकेट्स राखून विजय.. ही आहे भारताची इंग्लंडविरुद्धच्या ताज्या मालिकेतील कामगिरी. त्यामुळेच वानखेडेवर इंग्लिशचा पेपर कठीण असला तरी चौथ्या कसोटीसह मालिकेवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी भारताने चांगला गृहपाठ केला आहे. हा सामना भारताने बरोबरीत जरी सोडवला तरी इंग्लिश संघ मालिका गमावणार आहे.
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य