0
पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुस-या कसोटीतही भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला .टीम इंडियाने ९ बाद ६२२ धावांवर डाव घोषित केला . श्रीलंकेच्या गोलंदाजांचा अंत पाहिल्यानंतर अखेर भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिला डाव ६२२ धावांवर घोषीत केला आहे. भारताकडून मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत भारताला ६०० धावांचा टप्पा गाठून दिला. पहिल्या दिवशी शतकी खेळी करणारे चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्रन अश्विन यांना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी लवकर माघारी धाडले. कामचलाऊ गोलंदाज दिमुथ करुणरत्नेच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजारा माघारी परतला. दुसरÞ्या बाजून अंिजक्य रहाणेने किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात पुष्मकुमाराने रहाणेला तंबूत धाडले. रहाणेने १३२ धावांची खेळी केली. शतकवीर अंिजक्य रहाणे आणि चेतेश्वर पूजारा लवकर माघारी परतल्यानंतर वृद्धीमान सहा, अश्विन आणि रंिवद्र जाडेजा यांनी अर्धशतके फटकावली. त्यामुळे भारताला ६०० धावांचा टप्पा ओलांडता आला. या तिघांनी उपयुक्त भागीदा-या रचल्या. सहा (६७ ), अश्विनने (५४ ) धावा केल्या. जाडेजाने नाबाद (७० ) धावा केल्या. खेळाला सुरुवात झाल्यानंतर कालच्या धावसंख्येत आणखी ६ धावांची भर घातल्यानंतर ३५० धावांवर चेतेश्वर पूजाराच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी २१७ धावांची भागीदारी केली. आर. अश्विन ५४ धावा काढून हेराथ गोलंदाजीवर बोल्ड झाला.हार्दिक पांड्या २० चेंडूत २० धावा काढून बाद झाला. रंिवद्र जडेजा ७० आणि उमेश यादव ३ धावांवर नाबाद राहिले. नाणेफेक ंिजकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. करिअरमधील २५ वी कसोटी खेळणारÞ्या शिखर धवन आणि आजारातून सावरलेल्या लोकेश राहुलने संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. गत कसोटीत १९० धावांची खेळी करणारा धवन ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने संघाचा डाव सावरला.
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य