कोळश्याच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार यांनी व्यक्त केली नाराजी.
राज्य सरकारने ३ हजार कोटी रुपये थकवले म्हणून कोळसा पुरवठा केला जात नाही. असा सवाल करतानाच राज्यावर दोषारोप करणं हे योग्य नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोळश्याच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोळशाचा पुरवठा करण्याचा आग्रह आपण धरला. महाराष्ट्र सरकारकडून कोळसा पुरवठा करण्यासाठीचे ३ हजार कोटीचा रुपये आले नाही. त्यामुळे केंद्राला अडचणीला तोंड द्यावं लागत असल्याने कोळसा पुरवठा करण्यात आला नसल्याचं सांगितलं. मी याबाबतची माहिती घेतली. ३ हजार कोटी देणं आहे हे खरं आहे. त्यातील १४०० कोटी रुपये आज किंवा उद्या सरकार देणार आहे. महाराष्ट्राकडून कोळशाची किंमत द्यायला उशीर झाला म्हणून आरोप करतात. दुसऱ्या बाजूला जीएसटीची ३५ हजार कोटीचं देणं केंद्राकडे आहे. ते देत नाही. एका बाजूला ३५ हजार कोटी रुपये थकवायचे आणि तीन हजार कोटीसाठी कोळसा पुरवठा करायचा नाही. महाराष्ट्र सरकारवर दोषारोप करणं योग्य नाही, असं पवार म्हणाले. मी अनेक सरकारे पाहिली. राज्य सरकारबाबत केंद्राचा दृष्टीकोण सहानुभूतीचा असायचा. या देशात काही यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबीचा वापर हा त्या राज्यातील विरोधात केला जात आहे. इतर राज्यातही हाच प्रकार सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य