तसेच ग्रामस्थ आरोप करत आहेत की,'तलावाच्या कार्यक्षेत्रात येणारा ५०० मीटर लांबीचा रस्ता सुमार दर्जाचा बनविण्यात आला होता.या कामात लांबी-रुंदी, खडीकरण,डांबरीकरणाचे कोणतेही निकष पाळण्यात आलेले नाहीत आणि असे होऊनही एमएसआरडीसी...
तसेच ग्रामस्थ आरोप करत आहेत की,'तलावाच्या कार्यक्षेत्रात येणारा ५०० मीटर लांबीचा रस्ता सुमार दर्जाचा बनविण्यात आला होता.या कामात लांबी-रुंदी, खडीकरण,डांबरीकरणाचे कोणतेही निकष पाळण्यात आलेले नाहीत आणि असे होऊनही एमएसआरडीसी कंत्राटदारावर मेहेरबान झाली.पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली. तलावाच्या पाण्याने रस्त्याचे अधिक नुकसान होईल म्हणून बांध फोडला.तसेच तलावातून पाणी सोडण्यासाठी एक दरवाजाही आहे. पण त्या दरवाजाने टप्प्याटप्प्याने पाणी न सोडता सांडवाच फोडला.तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडून पाणी काढण्याचे हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान,काही गावकऱ्यांनी सांडवा फोडण्यासाठी प्रखर विरोध केला त्यामुळे तीन दिवस हे काम अडविण्यात आले होते आणि तेव्हाच धारूरच्या तहसीलदारांनी तलावाची पाहणी करीत रस्त्याला कोणताही धोका नसल्याचा अहवाल दिला होता.मात्र,जलसंधारण व एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात सकाळी अंधारातच तलावाचा सांडवा फोडून टाकला.त्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदारांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात यावा,अशी मागणी निवेदनातून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली आहे. धारूरच्या कृउबा सभापती सुनील शिनगारे, आरणवाडी सरपंच लहू फुटाणे, बाळासाहेब चव्हाण, गणेश चव्हाण, मधुकर चव्हाण, लहू शिनगारे, विजय माने, नाना माने, अविनाश माने आदी गावकऱ्यांनी निवेदन पाठविले आहे.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य