पालघर जिल्ह्याला लागलेला कुपोषण आणि बालमृत्यूचा विळखा अजूनही कायम आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यातच 40 बालमृत्यू, तर 5 मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्याला लागलेला कुपोषण आणि बालमृत्यूचा विळखा अजूनही कायम आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यातच 40 बालमृत्यू, तर 5 मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना काळात ग्रामीण भागातील अंगणवाडी, ग्राम बालविकास केंद्र आणि पालघर जिल्ह्यातील डगमगलेली आरोग्यव्यवस्था याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं. त्यामुळे कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्युदरात वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या एप्रिल आणि मे या 2 महिन्यातच 40 बालमृत्यू आणि 5 मातांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. असं असलं तरी पालघर जिल्हा प्रशासन अद्याप साखर झोपेतच असल्याचं पाहायला मिळत आहे पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 296 बालमृत्यू तर 12 मातांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र यावर्षी सुरुवातीलाच ही आकडेवारी वाढल्याने पालघर जिल्हा पुन्हा कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू अशा विळख्यात सापडलेला पाहायला मिळत आहे. एप्रिल महिन्यात 146 अतितीव्र कुपोषित तर 1609 कुपोषित बालके आढळून आली आहेत . तर मे महिन्यात यामध्ये वाढ झाल्याच दिसून येत असून 139 अतितीव्र, 1 हजार 679 तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत.
महत्वाच्या बातम्या
राजकीय
क्राइम
स्पोर्ट
कृषी
लाईफस्टाईल
सिनेमा
आरोग्य